पुरंदरच्या तहात कोणते 23 किल्ले होते ? | Purandarcha Tah
छत्रपती शिवाजी महाराजांनी (Purandarcha Tah) शाहिस्तेखानाची बोटे तोडली, सूरत लुटून मुघल साम्राज्याचे नाक कापले. दख्खनच्या भूमीत घडत असलेली ही क्रांती मुघल साम्राज्याला सुरुंग लावत होती. दररोज नवीन इतिहास घडत होता. एकेक मुलुख स्वतंत्र होत होता. महाराजांच्या या वाढत्या पराक्रमास पायबंद कसा घालावा या प्रश्नाने औरंगजेबाचे चिंतीत होता. महाराजांवर कोणास पाठवावे हा बिकट प्रश्न त्याला पडला होता. या अगोदर ज्यांनाही दख्खनच्या मोहिमेवर पाठविले ते पराभूतच झाले.
औरंगजेबाने त्यानंतर मिर्झाराजे जयसिंग यांना प्रचंड मोठे सैन्य , भरपूर दारुगोळा आणि युद्धसामुग्री सोबत दिलेरखान पठाण सारखे पराक्रमी सरदार दिले. मिर्झाराजाने आपले कसब पणाला लावून स्वराज्यावर चारही बाजूंनी घेरले. पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. मुरार बाजी देशपांडे यांनी मुघलांशी लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली. शेवटी महाराजांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले. हाच तो ऐतिहासिक पुरंदरचा तह होय. हा तह 11 जून 1665 ला झाला. या तहानुसार पुढील बाबी ठरल्या.

पुरंदरच्या तहात कोणते 23 किल्ले होते ?
स्त्रोत : गुगल